कोरोनाच्या संकटाने भल्याभल्यांच्या अहंकारी आणि कपटी वृत्तीला धूळ चारली आहे. परंतु अजूनही असे बरेच महाभाग शिल्लक आहेत की जे आपल्या या दोषाला घट्ट पकडूनच पुढील आयुष्य जगण्याच्या मानसिकतेत आहेत.
अशा भ्रमित लोकांना भविष्यातील त्यांच्या आयुष्यात कोरोनापेक्षाही जास्त धोका त्यांच्या या अपप्रवृत्तीपासून असेल.
कारण दुसर्याचे सुख पाहिल्यावर यांच्या मनाला अतोनात यातना होतात आणि त्यामुळे दुसर्याच्या आयुष्यात दुःखाचा शिडकाव करण्यासाठी कटकारस्थान करण्याच्या नादात हे लोक आपल्या आयुष्यातील बहुमुल्य वेळ आणि आनंदी क्षणांचा उपभोग घेण्यास पुरते विसरून जातात. मात्र त्यांच्या अथक प्रयत्नांनंतरही समोरील व्यक्तीच्या वाट्याला दुःख न आल्यास अशा व्यक्ती सैरभैर होऊन आपले पुढील आयुष्य नकळतपणे दुःखाच्या खाईत लोटण्यास स्वतःच जबाबदार ठरतात.
' काळाच्या आघाताने तरी
कपटवृत्तीला त्यागावे,
ज्याला नाही जमले त्याने
परिणाम त्याचे मग भोगावे '
✒ K. Satish

No comments:
Post a Comment