जलनेवाले जलते है
धुआँ उडाके जाते है ,
मगर
दुसरों के ऊपर जलते जलते
वो खुद ही पिछडते जाते है ।
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
जलनेवाले जलते है
धुआँ उडाके जाते है ,
पर
अपने हुनर को आजमानेवाले
एक नया मक़ाम पाते है ।
✒️ K. Satish
जलनेवाले जलते है
धुआँ उडाके जाते है ,
मगर
दुसरों के ऊपर जलते जलते
वो खुद ही पिछडते जाते है ।
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
जलनेवाले जलते है
धुआँ उडाके जाते है ,
पर
अपने हुनर को आजमानेवाले
एक नया मक़ाम पाते है ।
✒️ K. Satish
मतदानाची तारीख जवळ येऊ लागली
पैशाच्या पावसात जनता न्हावू लागली,
घरोघरी जाऊन पैसे हाती देऊन
लोकशाहीची विटंबना होऊ लागली
खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ
खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ
✒ K. Satish
एक गहण सामाजिक प्रश्न..... खरंच मातापित्यांनी मुलांना जन्म देणे हे त्या मुलांवर उपकार असतात का ?, त्यांना या जगात आणून त्यांनी या मुलांवर मोठी मेहेरबानी केलेली असते का ?
हा प्रश्न पडण्याचे कारण की, समाजात सर्व स्तरावर मुलांना या गोष्टीची सतत जाणीव करून दिली जाते की, तुझ्या आई वडीलांमुळेच तू हे जग पाहू शकलास आणि ते अजिबात खोटे नाही. निश्चितच त्यांच्या आईवडिलांचे मिलन झालेच नसते तर ही मुले जन्माला खरोखरच आली नसती.
परंतु, मुद्दा हा उरतो की, या मुलांवर उपकार करण्यासाठीच सर्व आई वडीलांनी मुलांना जन्म दिलेला असतो का ?....की, आपल्याला मुलाचे सुख लाभावे, समाजात आपल्याला मूल झाले याचा आनंदोत्सव साजरा करता यावा, ' मूल होत नाही ' अशा समाजातील टोचून बोलणाऱ्या टोमण्यांपासून आपला बचाव व्हावा व सामाजिक स्वास्थ्याच्या हेतूने लग्नबंधनात अडकून आपल्या शारिरीक गरजा भागाव्यात या सर्व गोष्टी त्यामागे नाहीत का ?
माणसाने स्वतःच्या आनंदासाठी मूल जन्माला घातल्यानंतर त्याच्यावर उपकाराची भाषा करून त्याला या गोष्टीची जाणीव करून देण्याची पद्धत मोडीत निघायला हवी. सर्व सजीवांची उत्पत्ती हे निसर्गचक्र आहे. आपण फक्त निमित्तमात्र असतो. त्यामुळे सर्व मातापित्यांनी आपल्या मुलांवर फक्त जन्म दिला म्हणून अधिकारवाणीने हक्क गाजवून त्यांना चुकीच्या गोष्टीदेखील करायला भाग पाडणे अथवा त्यांच्यावर अत्याचार करणे हे या निसर्गचक्राचा गैरवापर केल्यासारखेच आहे.
त्यामुळे प्रत्येक मातापित्याने आपल्या मुलांना फक्त जन्म दिला म्हणून अधिकार गाजवणे बंद केले पाहिजे व समाजानेही या विधानाचा ऊहापोह करून मुलांना फक्त ज्ञानाचे डोस पाजून कात्रीत पकडण्याऐवजी या मुलांना जीव लावावा, त्यांना माता पिता या नात्याने तुमचे प्रेम द्यावे, आपुलकी आणि जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावेत आणि फक्त जन्म दिला म्हणून नाही तर तुमच्या सुस्वभावाने, चांगल्या वर्तणुकीने, मायेने त्यांची मने जिंकावीत...
✒ K.Satish
या देशात ताजसारख्या पंचतारांकित हाॅटेलमध्ये जेवायला जाण्याचे स्वप्न पाहता पाहता कित्येकांची हयात निघून जाते, पण ते या स्वप्नाची पूर्तता करू शकत नाहीत.
परंतु, याच देशातील नेते मंडळींच्या मिटींगावर मिटींगा ताजसारख्या पंचतारांकित हाॅटेलमध्ये होणे ही सर्वसामान्य बाब झाली आहे.
आणि पैसा त्याच जनताजनार्दनांचा की, ज्यांना स्वतःच्या गरजा भागवता भागवता उभ्या हयातीत अशा हाॅटेलमध्ये एक दिवस कुटुंबासहित जेवायला जाण्याचे स्वप्नदेखील पूर्ण करता येत नाही.
✒ K. Satish
समाजात काही नाती ही अतिशय आदरणीय असतात. परंतु त्याला अपवाद असणाऱ्या प्रवृत्तीची अनेक उदाहरणेही याच समाजात आपल्याला पहावयास मिळतात. त्यामुळेच तर जन्मदात्या पित्याकडूनच स्वतःच्या मुलीवरच अत्याचार करण्याच्या घटना असो, स्वतःच्या स्वार्थापोटी व व्यभिचारापोटी स्वतःच्याच मुलांची हत्या करणारी माता असो वा आर्थिक लोभ किंवा वासनेपोटी आपल्या शिष्यांचे शोषण करणारे गुरूजन असो ...अशी दुष्ट प्रवृत्तीची माणसे या महान नात्यांच्या आडून आपल्या वाईट मनसुब्यांना पूर्णत्वास नेत असतात.
समाजात नेहमी माता, पिता, गुरूतुल्य व्यक्ती, आध्यात्मिक व्यक्ती यांना नात्याच्या आधारे अथवा समाजातील आदरणीय स्थानाच्या आधारे झुकते माप दिले जाते. आणि नेमका याच गोष्टीचा फायदा अशी नात्यांच्या आड दडलेली काही अपप्रवृत्तींची मंडळी घेतात व आपल्या दुष्कृत्यांना अंमलात आणून अनेक निष्पापांचे आयुष्य उध्वस्त करून टाकतात. आणि त्यामुळेच अनेकदा नकळतपणे समाजाची भूमिकादेखील अशा चुकीच्या गोष्टी घडण्याला बळ देणारी ठरते.
अतिशय खालच्या पातळीवर घसरून नात्यांना काळिमा फासणाऱ्या व्यक्तींना केवळ नात्यांचा मान राखण्याची पारंपारिक औपचारिकता पूर्ण करण्याहेतूने मान देण्याचा अट्टाहास करण्याची समाजातील मानसिकता ही मानवता व माणुसकीचा गळा दाबून हत्या करण्यासमान आहे.अशामुळेच अनेक अपप्रवृत्तींच्या व्यक्ती केवळ नात्याचा आधार घेऊन व समाजाची सहानुभूती मिळवून इतर निष्पापांच्या आयुष्याशी खेळण्यात यशस्वी होतात.
म्हणूनच म्हणतो की,
चांगुलपणाचा गुण चांगलाच...
तो मनाचा मोठेपणादेखील असतो.
पण आपल्या चांगुलपणाचा
सतत गैरफायदा घेतला जात असेल
तर तोच चांगुलपणा
आपला मूर्खपणा ठरू शकतो.
कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...