Wednesday, May 6, 2026
Monday, May 4, 2026
नीच प्रवृत्ती
Monday, April 6, 2026
Monday, August 4, 2025
शब्दांच्या शस्त्राची धार
बोलताना शब्दांचा अतिशय विचारपूर्वक वापर केला पाहिजे.
शब्दांच्या शस्त्राला इतकी धार असते की, त्याने केलेल्या वारांची जखम सहजासहजी भरून निघत नाही. आणि भरून निघालीच तरी ती अधूनमधून चिघळत राहतेच.
✒️ K. Satish
Tuesday, February 4, 2025
खरे नाते
Tuesday, April 23, 2024
सत्यवचन
Saturday, April 6, 2024
नाकर्त्या नेत्यांचे कसब
जनता नकळतपणे आपल्याच पुढील नुकसानाकरिता या नेत्यांना अदृश्यपणे बळ देत असते. कारण, जनतेतील जागरूक लोकांच्या कडवट वृत्तीपेक्षा या नेत्यांची आणि त्यांच्या चमच्यांची कपटी मधुर वाणी जनतेला भ्रमित करीत असते.
Saturday, September 23, 2023
गणरायाला पत्र
Wednesday, July 5, 2023
Friday, May 5, 2023
छुपे षडयंत्र
त्यातच गावातील एक दलित स्त्री उच्चशिक्षण घेऊन समाजातील दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि गावाच्या विकासासाठी लढत असते. एका कनिष्ठ जातीतील महिला असूनही तिची वाढत चाललेली लोकप्रियता ही त्या प्रतिष्ठित राजकारण्याला खटकू लागते. तो दिवसरात्र त्या महिलेला कसे नामोहरम करता येईल व तिचे कसे मानसिक खच्चीकरण करता येईल याचाच विचार करत असतो. परंतु असे करताना त्याला स्वतःला तर या प्रकरणापासून दूर ठेवायचे असतेच, पण त्या महिलेला त्रास झाल्यास तिला सहानुभूती मिळून हे प्रकरण चिघळू नये व जागीच शांत व्हावे असे काहीतरी करण्याची त्याची इच्छा असते.
विचार करता करता त्याला एक धूर्त कल्पना सुचते व तो त्याच्या अंमलबजावणीच्या तयारीला लागतो.
त्या गावात एक ठार वेडा मनुष्य रहात असतो. त्याला गोंजारून, आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होतात. १५ - २० दिवसांच्या प्रयत्नानंतर तो वेडा पूर्णपणे त्याच्या अधिपत्याखाली येतो. तो धनाढ्य व्यक्ती जे सांगेल ते करणे येवढेच तो करू लागतो.
एके दिवशी ठरलेल्या कारस्थानानुसार तो त्या महिलेविषयी काही गोष्टी त्या वेड्याच्या मनात पेरतो व त्या वेड्याकरवी त्या महिलेचा विनयभंग करण्याचे षडयंत्र रचतो.
ठरल्याप्रमाणे ती महिला गावातून जात असताना ज्यावेळी लोकांची जास्त वर्दळ नसेल हे हेरून त्या वेड्याला त्या महिलेच्या आसपास पोहोचविले जाते. अर्थात या सर्व कामात त्या राजकारण्याचे इतर कार्यकर्तेदेखील मदत करत असतात व सर्व परिस्थितीवर नजर ठेवून असतात. त्या वेड्याला अशाप्रकारे तयार केलेले असते की, ती महिला समोर दिसताच क्षणार्धात तो तिच्यावर झडप घालतो. त्या महिलेला काहीच सुचत नाही. आजूबाजूला काही लहान मुले खेळत असतात. बाकी मोठी माणसे क्षणार्धात पोहोचू शकतील अशा टप्प्यात नसतात. तो राजकारणी व त्याचे चमचे मात्र लपून सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असतात. आणि त्या वेड्याने केलेला हल्ला इतका जबरदस्त असतो की, काही सुचायला उसंतच मिळत नाही. तो मिनिटाच्या आत त्या महिलेचे सर्व कपडे फाडून तिला जवळजवळ विवस्त्रच करून सोडतो. महिला जीवाच्या आकांताने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते परंतु तो मनुष्य वेडा असतोच पण शरीराने आडदांडही असतो. त्यामुळे तिचे सर्व प्रयत्न असफल ठरतात. त्यातच अचानक घडलेल्या या भयंकर प्रसंगाने ती हादरून जाते. ती आरडाओरड करते परंतु लोक जमा होईपर्यंत खूप उशीर होतो. लोक जमा होईपर्यंत तो वेडा तिच्या कपड्यांच्या अक्षरशः चिंध्या करून टाकतो. नंतर आवाज ऐकून काही लोक तेथे पळत येतात व ते त्या वेड्याला बाजूला नेऊन मारायला सुरुवात करतात. या गडबडीत त्या महिलेला आधार देऊन तिची अब्रू झाकण्याकडे कोणाचेच लक्ष जात नाही. हळूहळू लहान मोठे, स्त्री पुरूष, आबालवृद्ध साऱ्यांची आजूबाजूला गर्दी वाढू लागते. त्या सर्वांसमोर त्या अवस्थेत थांबताना त्या महिलेच्या आत्मसन्मानाची अक्षरशः अंत्ययात्राच निघते. काही महिलांच्या लक्षात ही बाब येऊन त्या काही वस्रांच्या सहाय्याने तिची लाज झाकतात. परंतु त्याला खूप उशीर झालेला असतो. त्या महिलेचे विवस्त्र दृश्य सर्व गावकऱ्यांच्या नजरेत साठून गेलेले असते, तिचे मानसिक खच्चीकरण झालेले असते, तिच्या आत्मसन्मानाला खूप मोठा धक्का पोहोचलेला असतो. त्या राजकारण्याचा डाव साधला गेलेला असतो.
आता प्रश्न उरतो तो म्हणजे हे प्रकरण सहानुभूतीपूर्वक त्या महिलेच्या बाजूने वळू न देता त्याला पूर्णविराम देण्याचा. त्या कार्याला आकार देण्यास आता सुरूवात होते. त्या वेड्याला गावकऱ्यांनी पकडून चोप द्यायला सुरुवात केल्यावर तेथे त्या नेत्याचे व त्याच्या चमच्याचे आगमन होते. व ते त्या वेड्याला गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवतात. गावकऱ्यांना शांत करत तो नालायक धनी मनुष्य त्यांची समजूत काढण्याच्या सुरात बोलू लागतो, " अरेरे, झाला प्रकार खूप वाईट झाला. असे घडायला नको होते. परंतु हा मनुष्य तर ठार वेडा आहे. त्याला त्याच्या अंगावर कपडे आहे की नाही याचेही भान नसते. लाज - अब्रू काय असते याची त्याला काहीच कल्पना नाही त्यामुळे हे काही त्याने जाणीवपूर्वक केलेले नसणार. त्याने केलेले कृत्य नक्कीच चुकीचे असले तरी तो ठार वेडा आहे हेदेखील लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे त्याला मारून काहीच उपयोग होणार नाही. त्याला सोडून देणेच उचित ठरेल. "
हळूहळू त्याचे म्हणणे लोकांना पटू लागते. लोकांचा राग कमी होऊ लागतो व अखेर सर्व शांत होते. त्या व्यक्तीने वेड्याकरवी हे कृत्य घडवून एका दगडात अनेक पक्षी मारलेले असतात.
त्याने त्याच्या जातीविषयक घाणेरड्या मानसिकतेचा विजय केलेला असतो, त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या मानसिक धैर्याचे खच्चीकरण केलेले असते, स्वतःवर या प्रकरणाचा एकही शिंतोडा उडू न देता हे सर्व त्याने साध्य केलेले असते. व अपराधी हा वेडा असल्याचे कारण देऊन प्रकरण तेथेच मोडीत काढलेले असते. त्यातच त्याच गावातील मनातून जातव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या, इतर कनिष्ठ जातीला तुच्छ समजणार्या परंतु उघडपणे बोलू न शकणार्या काही दुटप्पी लोकांचे या प्रकाराला मूक समर्थनच असते. वरवर समतेचा दिखावा करताना जातीय द्वेषाचे बीज त्यांनी उरी बाळगलेले असते. त्यामुळे आता त्या महिलेच्या खर्या यातना समजून घेणारे, तिला मानसिक धैर्य देऊन खर्या अर्थाने आधार देणारे कोणीच नसते. फारफार तर खोट्या सहानुभूतीचे दोन शब्द बोलण्यापलीकडे तिच्यासाठी कोणी काहीही करणार नसते. कदाचित यापुढे त्या महिलेसोबत घडलेला प्रसंग पाहून इतर कोणी पुन्हा व्यवस्थेच्या नाकर्तेपणाविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवून लोकांना न्याय मिळवून देण्याच्या भानगडीत पडणार नसते.
समाजात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात घडणारे हे ज्वलंत वास्तव आहे. अनेक धर्मांध प्रवृत्तीचे लोक, अनेक धूर्त राजकारणी आपला कपटी डाव साधण्याकरिता अनेकदा अशा वेड्यांना पुढे करतात फक्त हे खरे वेडे नसून जातीव्यवस्थेचा पगडा असलेले, राजकारण्यांची - धनदांडग्यांची अंधभक्ती करणारे घाणेरड्या विचारांनी वेडी झालेली मंडळी असतात. आणि अशा व्यक्तींच्या विचित्र वागण्यावर, विचित्र बोलण्यावर काही सुज्ञ लोकांनी आक्षेप घेतल्यास, ' अरे तो वेडा आहे...तुम्हीतर शहाणे आहात ना ? त्याच्याकडे लक्ष देऊ नका ' अशी कावेबाज समजूत ही धूर्त मंडळी समाजातील या सूज्ञ मंडळींची काढतात. व त्यांच्या या शब्दछलामध्ये फसून समाजातील वैचारिक लोकसुद्धा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करीत राहतात. व अन्यायाची ही मालिका अशीच अविरत सुरू राहते.
समाजात वर्चस्व असणाऱ्या वर्गातील वैचारिक प्रगल्भता असणाऱ्या अभ्यासू लोकांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून अशा अपप्रवृत्तींवर वेळीच आळा घालून (अजूनही उघडपणे न दिसणार्या) समाजातील सामाजिक असमानतेची झळ सोसणाऱ्या पीडित समाजाचे दुःख समजून घ्यायला हवे. व त्यांच्या सामाजिक हक्कांसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायला हवे. असे झाल्यास आपला देश एकसंघ होऊन खर्या अर्थाने जगाला मानवतेचा संदेश देत प्रगतीच्या उच्च शिखरावर पोहोचणे हे दिवास्वप्न न राहता एक सुखद सत्य ठरेल.
धन्यवाद...!!! 🙏🏻
Sunday, March 26, 2023
Saturday, March 11, 2023
असेल पत तर मिळेल किंमत
एखादा साधा कागद जर रस्त्यात पडला असेल, तर लोक एकतर त्याला दुर्लक्षित करतात किंवा त्याला लाथाडून, तुडवून पुढे निघून जातात.
परंतु , तोच कागद एखाद्या 100, 200, 500, 2000 च्या नोटेचं स्वरूप प्राप्त झाल्यावर पडलेला दिसला तर त्याला आपलेसे करण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ लागते.
मनुष्याच्या बाबतीतही असेच घडते.......
✒ K. Satish
Tuesday, February 28, 2023
Saturday, February 11, 2023
यशाची किरणे
रात्रीच्या काळोखात पडणार्या चांदण्यांच्या
प्रकाशाची रंगत भलतीच न्यारी असते,
अन् अपयशाच्या गुहेमध्ये पडणार्या
यशाच्या किरणांची मजा खरंच भारी असते...
✒ K. Satish
Tuesday, November 22, 2022
अहंकार आणि हट्टीपणा
मग कधीतरी जीवनातील एखाद्या कठीण समयी त्याला ह्या व्यक्तींची प्रकर्षाने उणीव भासते. त्यावेळी मात्र त्याच्या हाती हळहळ आणि पश्चात्ताप करण्याशिवाय काहीच उरत नाही.
म्हणूनच आपल्यातील अहंकार आणि हट्टीपणाला वेळीच आवर घालायला शिकले पाहिजे, नाहीतर या सुंदर जगामध्ये अगदी नशीबाने तुमच्या आयुष्यात आलेल्या थोड्या थोडक्या चांगल्या माणसांनाही तुम्ही गमावून बसाल.
आणि मग ह्या स्वार्थाने भरलेल्या दुनियेत अनेक अडचणींना सामोरे जाताना व्यथित होऊन तुमचे आयुष्य कधी संपून जाईल हे तुम्हाला कळणार देखील नाही...
Saturday, July 23, 2022
एक सामाजिक कटुसत्य
एक गहण सामाजिक प्रश्न..... खरंच मातापित्यांनी मुलांना जन्म देणे हे त्या मुलांवर उपकार असतात का ?, त्यांना या जगात आणून त्यांनी या मुलांवर मोठी मेहेरबानी केलेली असते का ?
हा प्रश्न पडण्याचे कारण की, समाजात सर्व स्तरावर मुलांना या गोष्टीची सतत जाणीव करून दिली जाते की, तुझ्या आई वडीलांमुळेच तू हे जग पाहू शकलास आणि ते अजिबात खोटे नाही. निश्चितच त्यांच्या आईवडिलांचे मिलन झालेच नसते तर ही मुले जन्माला खरोखरच आली नसती.
परंतु, मुद्दा हा उरतो की, या मुलांवर उपकार करण्यासाठीच सर्व आई वडीलांनी मुलांना जन्म दिलेला असतो का ?....की, आपल्याला मुलाचे सुख लाभावे, समाजात आपल्याला मूल झाले याचा आनंदोत्सव साजरा करता यावा, ' मूल होत नाही ' अशा समाजातील टोचून बोलणाऱ्या टोमण्यांपासून आपला बचाव व्हावा व सामाजिक स्वास्थ्याच्या हेतूने लग्नबंधनात अडकून आपल्या शारिरीक गरजा भागाव्यात या सर्व गोष्टी त्यामागे नाहीत का ?
माणसाने स्वतःच्या आनंदासाठी मूल जन्माला घातल्यानंतर त्याच्यावर उपकाराची भाषा करून त्याला या गोष्टीची जाणीव करून देण्याची पद्धत मोडीत निघायला हवी. सर्व सजीवांची उत्पत्ती हे निसर्गचक्र आहे. आपण फक्त निमित्तमात्र असतो. त्यामुळे सर्व मातापित्यांनी आपल्या मुलांवर फक्त जन्म दिला म्हणून अधिकारवाणीने हक्क गाजवून त्यांना चुकीच्या गोष्टीदेखील करायला भाग पाडणे अथवा त्यांच्यावर अत्याचार करणे हे या निसर्गचक्राचा गैरवापर केल्यासारखेच आहे.
त्यामुळे प्रत्येक मातापित्याने आपल्या मुलांना फक्त जन्म दिला म्हणून अधिकार गाजवणे बंद केले पाहिजे व समाजानेही या विधानाचा ऊहापोह करून मुलांना फक्त ज्ञानाचे डोस पाजून कात्रीत पकडण्याऐवजी या मुलांना जीव लावावा, त्यांना माता पिता या नात्याने तुमचे प्रेम द्यावे, आपुलकी आणि जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावेत आणि फक्त जन्म दिला म्हणून नाही तर तुमच्या सुस्वभावाने, चांगल्या वर्तणुकीने, मायेने त्यांची मने जिंकावीत...
संदेश सार्यांना कळवावा,
या नात्याचा सन्मान आपल्या
आचरणातून मिळवावा...
✒ K.Satish
Thursday, July 21, 2022
नाते
Friday, June 24, 2022
सगळा गोंधळ
हिकडंबी झाला धिंगाणा
आन् तिकडंबी झाला धिंगाणा,
कोण कुणाच्या मागं लागलं
काहीचं आता समजंना,
हातातं देतो हातं कुणी
पाय अचानक वढतो,
गोंधळं गोंधळं गोंधळं
सगळा गोंधळं गोंधळं गोंधळं
गोंधळं गोंधळं गोंधळं
सगळा गोंधळं गोंधळं गोंधळं
✒ K. Satish
Tuesday, May 3, 2022
आचरण महत्त्वाचे
समाजात काही नाती ही अतिशय आदरणीय असतात. परंतु त्याला अपवाद असणाऱ्या प्रवृत्तीची अनेक उदाहरणेही याच समाजात आपल्याला पहावयास मिळतात. त्यामुळेच तर जन्मदात्या पित्याकडूनच स्वतःच्या मुलीवरच अत्याचार करण्याच्या घटना असो, स्वतःच्या स्वार्थापोटी व व्यभिचारापोटी स्वतःच्याच मुलांची हत्या करणारी माता असो वा आर्थिक लोभ किंवा वासनेपोटी आपल्या शिष्यांचे शोषण करणारे गुरूजन असो ...अशी दुष्ट प्रवृत्तीची माणसे या महान नात्यांच्या आडून आपल्या वाईट मनसुब्यांना पूर्णत्वास नेत असतात.
समाजात नेहमी माता, पिता, गुरूतुल्य व्यक्ती, आध्यात्मिक व्यक्ती यांना नात्याच्या आधारे अथवा समाजातील आदरणीय स्थानाच्या आधारे झुकते माप दिले जाते. आणि नेमका याच गोष्टीचा फायदा अशी नात्यांच्या आड दडलेली काही अपप्रवृत्तींची मंडळी घेतात व आपल्या दुष्कृत्यांना अंमलात आणून अनेक निष्पापांचे आयुष्य उध्वस्त करून टाकतात. आणि त्यामुळेच अनेकदा नकळतपणे समाजाची भूमिकादेखील अशा चुकीच्या गोष्टी घडण्याला बळ देणारी ठरते.
अतिशय खालच्या पातळीवर घसरून नात्यांना काळिमा फासणाऱ्या व्यक्तींना केवळ नात्यांचा मान राखण्याची पारंपारिक औपचारिकता पूर्ण करण्याहेतूने मान देण्याचा अट्टाहास करण्याची समाजातील मानसिकता ही मानवता व माणुसकीचा गळा दाबून हत्या करण्यासमान आहे.अशामुळेच अनेक अपप्रवृत्तींच्या व्यक्ती केवळ नात्याचा आधार घेऊन व समाजाची सहानुभूती मिळवून इतर निष्पापांच्या आयुष्याशी खेळण्यात यशस्वी होतात.
म्हणूनच म्हणतो की,
Monday, January 10, 2022
क्षणभंगुर आनंद
काही व्यक्तींना सतत दुसर्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कपट कारस्थान करण्याची सवय असते. त्याअन्वये इतरांना दुःखी करण्याचा त्यांचा मानस असतो.
परंतु , अशा व्यक्तींना आयुष्यात कधीच आनंदाची खरी परीभाषा उमजू शकत नाही. कारण ते स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या दुःखातच जास्त आनंदी होत असतात.
आणि अशा आनंदाचे आयुष्य अगदीच क्षणभंगुर असते.
✒ K. SATISH
-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अडचणींचा तो विशाल डोंगर अदम्य जिद्दीने करूनी पार, शिक्षित करूनी स्त्री जातीला केला अज्ञानावरी वार स्त्री शिक्...
-
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥ हे गणराया सर्वप्रथम तुला सर्व पृथ्वीवासियांतर्फे कोटी को...
-
मानवप्रजाती पृथ्वीतलावरी असे अति बलशाली हो, तरीही त्याला हतबल करीतसे नैसर्गिक कार्यप्रणाली हो प्रगतीपथावर गेलो जरी तरी ठाव न लागे निसर्गाचा,...
-
एखादी बलात्काराची घटना घडते. नेहमीप्रमाणे दबली न जाता ती समाजमाध्यमांसमोर उघड होते आणि मग सुरू होतो जनतेचा उद्रेक...संतापाची लाट...मोर्च...
-
नाकर्त्या नेत्यांची एक खासियत असते. ते जनतेचे भले करण्याऐवजी पद्धतशीरपणे उघड उघड जनतेचे नुकसान करूनदेखील पुन्हा हे नुकसान जनतेतीलच काही ...
कर्तृत्व
कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...





%20Thoughtswing.com%20title%20images_085.jpg)
%20Thoughtswing.com_132.jpg)
%20Thoughtswing.com%20title%20images_081.jpg)
%20Thoughtswing.com_105.jpg)
%20Thoughtswing.com%20title%20images_079.jpg)
%20Thoughtswing.com_100.jpg)
%20Thoughtswing.com%20title%20images_077.jpg)




%20Thoughtswing.com%20title%20images_073.jpg)
%20Thoughtswing.com_55.jpg)
%20Thoughtswing.com%20title%20images_67.jpg)
%20Thoughtswing.com%20title%20images_60.jpg)
Thoughtswing.com_098.jpg)
%20Thoughtswing.com%20title%20images_58.jpg)
Thoughtswing.com_169.jpg)
%20Thoughtswing.com%20title%20images_56.jpg)
Thoughtswing.com_499.jpg)
%20Thoughtswing.com%20title%20images_32.jpg)
Thoughtswing.com_171.jpg)
%20Thoughtswing.com%20title%20images_30.jpg)
Thoughtswing.com_034.jpg)
%20Thoughtswing.com%20title%20images_5.jpg)
%20Thoughtswing.com_9.jpg)
%20Thoughtswing.com%20title%20images_2.jpg)
Thoughtswing.com_009.jpg)
Thoughtswing.com_296.jpg)
Thoughtswing.com_467.jpg)