Wednesday, May 13, 2026

दगाबाज

स्वार्थी नेत्यांचे बनूनी गुलाम
मित्राशी केला कावा,
नक्कीच होईल पश्चाताप
आहे हा माझा दावा

✒️ K. Satish




Tuesday, May 12, 2026

प्रभावी शस्त्र

लेखणी माझा स्वाभिमान,
लेखणी माझे शस्त्र
तिच्याच सामर्थ्यावर करतो
अन्यायाला विवस्त्र

✒️ K. Satish








Wednesday, May 6, 2026

दुटप्पी

ओठावरती साखर अन
मनात मात्र द्वेष
साळसूदपणाचा मुखवटा
हाच तुमचा वेष

✒️ K. Satish



Monday, May 4, 2026

नीच प्रवृत्ती

मनुष्य हा तर एक निमित्त
नीच प्रवृत्ती हेच एक सत्य
नीच प्रवृत्तींमुळेच तर घडतात
समाजातील घाणेरडी कृत्य

✒️ K. Satish







Friday, May 1, 2026

महाराष्ट्र दिन व कामगारदिनानिमित्त शुभेच्छा

 महाराष्ट्र दिन

महापुरूषांची भूमी आमुची
आहे तिचा आम्हा अभिमान,
निष्ठा आमची सदा तिच्यावरी
तीच आमचे जीव की प्राण

महाराष्ट्राचा डंका वाजे
चारी दिशांमध्ये नाव हे गाजे,
महान अशा या राज्याला हो
'महाराष्ट्र' हे नावच साजे

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

कामगार दिन

प्रगतीमध्ये साथ हो ज्यांची
उद्योगाचा आत्मा जे,
कामावरती निष्ठा त्यांची
बळ देशाला देई ते

कार्य चालते या देशाचे
त्यांच्या अविरत कष्टाने,
संकटातही धावून येती
निरनिराळ्या रूपाने

जीवन जगणे झाले सोपे
यांच्यामुळेच सर्वांचे,
कामगार बंधूंचा जय हो
वंदन त्यांना मानाचे...!!!

✒️ K. Satish







Monday, April 6, 2026

Sunday Working

एकेकाळी शनिवारी शाळेतील अर्ध्या सुट्टीचा आनंद घेणारी पिढी

आज रविवारीसुद्धा कामाला जाण्याची
धडपड करत आहे.

( काळ, वेळ आयुष्यात असे अनपेक्षित बदल घडवतात. )

✒️ K. Satish




Tuesday, March 17, 2026

लोकशाहीचा आधारस्तंभ व लोकशाही टिकवून ठेवणारे खरे योद्धे

 देशातील सर्व निर्भीड व प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ पत्रकार आणि साहित्यिकांना मानाचा सलाम...
(लोकशाहीचा आधारस्तंभ व लोकशाही टिकवून ठेवणारे खरे योद्धे )

   देशहितासाठी झटणाऱ्या, अन्यायाला वाचा फोडणाऱ्या, सरकारच्या चुकीच्या कार्यप्रणालीवर निर्भीडपणे जाब विचारणाऱ्या स्वाभिमानी लेखणीला आणि प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ पत्रकारितेला संपवण्याचे, तिची गळचेपी करून लोकशाहीच्या नावाखाली अदृश्य अशी भयानक हुकूमशाही सुरू ठेवण्याचे षडयंत्र सुरू झालेले आहे. जे कधीच सर्वसाधारण सामान्य जनतेला न्याय, हक्क व चांगली जीवनशैली प्रदान करू शकत नाही.
   भ्रष्ट व्यवस्थेला खतपाणी घालण्यासाठी पूरक खत म्हणून लाचार, विकल्या गेलेल्या लेखण्यांचा सुळसुळाट या सरकारच्या काळात विपुल प्रमाणात झालेला आहे. अशा पैशाने विकल्या गेलेल्या लोकांनी पत्रकारिता हे क्षेत्र निवडण्याऐवजी राज्यकर्त्यांचे अधिकृत चापलूस बनून राहणे योग्य ठरेल.
   कारण पत्रकारिता हे फक्त पैसे कमावण्याचे साधन नसून तो एक क्रांतीचा आवाज आहे, अन्यायाविरुद्ध लढण्याचा, दबल्या-पिचलेल्या गरीब जनतेच्या हक्कांचा एल्गार आहे, देशाची अखंडता, सार्वभौमत्व टिकवून जनतेच्या प्रत्येक पैशाचे नियोजन सरकारमधील जनतेचे सेवक असलेले राजकारणी आणि अधिकारी नीट प्रामाणिकपणे करत आहेत का यावर बारीक लक्ष ठेवून ते चुकत असतील तर त्यांना जाब विचारून जनतेला त्याबद्दल जागृत करून देशहित जपणारे एक जबाबदारीचे पद आहे.
   आणि हे सर्व ज्या जनतेसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे त्या जनतेने नेत्यांची, राजकारण्यांची भक्ती करणे सोडून खऱ्या पत्रकारितेला बळ व खंबीर पाठिंबा देणे गरजेचे आहे. तरच जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटेल व चापलूसी करणाऱ्या बनावट स्वार्थी पत्रकार व साहित्यिकांना जरब बसेल आणि सत्यपरिस्थिती जनतेसमोर येईल.
   अन्यथा स्वातंत्र्य मिळूनही स्वतःच्या देशातील माणसांच्या हातातच देशाचा कारभार व स्वतःचा कष्टाचा पैसा सोपवून अदृश्य पारतंत्र्यात जीवन जगण्यात धन्यता मानणारी जमात म्हणून आपली ख्याती चिरकाल पृथ्वीतलावर टिकून राहील.
   
" एकजुटीची ताकद आता
दाखवण्याची गरज भासते,
षंढासारखे जीवन जगणे
हे तर मरण्यासमान असते..."

@कवी/गीतकार
के. सतीश
✒️K. Satish




कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...